@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर हा मुख्यमंत्री यांच्या अधिनस्त असणारी बाब असून , सदर सहाय्यता निधीमधून मुख्यमंत्री त्यांच्या सहीने काही विशिष्ट उद्दिष्ट्ये समोर ठेवून , नागरिकांना आर्थिक मदत केली जाते .
या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक अथवा अन्य स्वरुपातील मदत तात्काळ करणे . यांमध्ये आपल्या राज्यातील अथवा देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी निधीचा वापर केला जावू शकतो . तसेच जातीय दंगलीमध्ये मृत व्यक्तींच्या वारस दारांना त्याचबरोबर ज्यांना दुखापत झाली आहे व / अथवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे , अशा नागरिकांना मदत केली जाते .
दहशतवादी हल्यांमध्ये मरण पावलेल्या अथवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सदर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत केली जाते . रुग्णांना उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याकरीता अपघाती मरण पावलेल्या ( यांमध्ये मोटार / रेल्वे / विमान / जहाज अपघात वगळता ) व्यक्तींचा वारसांना आर्थिक मदत केली जाते .
तसेच शैक्षणिक , सांस्कृतिक चर्चासत्रे व संमेलने तसेच सामाजिक कार्यक्रमे आयोजनासाठी सदर निधीचा वापर केला जातो . तसेच आर्थिक अथवा अन्य स्वरुपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना मदत केली जाते .
त्याचबरोबर शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत : आर्थीक अथवा अन्य स्वरुपात मदत केली जाते . सदर सहाय्यता निधीमधून लाभ घेण्याकरीता cmrf.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…