@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या भारतीय शिक्षण प्रणालीचा विचार केला असता , बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी करुन नोकरी मिळण्याचे प्रमाण खुपच कमी आहेत . परंतु आजच्या काळांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेतल्यास , नोकरी मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहेत .
आजच्या काळांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून , खाजगी कंपनीला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीत . आपल्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये थेअरीला सर्वाधिक महत्व दिले जाते , परंतु प्रॅक्टिकला नॉलेजला महत्व दिले जात नसल्याने कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे . तेच जर विदेशातील शिक्षणांचा विचार केला असता , विदेशांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला सर्वाधिक महत्व दिले जाते .
जसे कि , आपण जर आजकाल खाजगी कंपन्यांमध्ये आयटीआय झालेल्या ( प्रॅक्टीकल नॉलेज ) विद्यार्थ्यांस बी.ई झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये चांगला पगार दिला जात आहे , कारण बी.ई झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसते . यामुळे आपल्या देशांमध्ये डिग्री होल्डरांची संख्या वाढत चालली असली तर , प्रॅक्टिकल नॉलेज मोठा अभाव आहे .
हेच जर आपल्या शेजारील देश चीन देशांचा विचार केला तर चीन देशांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला सर्वाधिक महत्व देतात , त्यामुळे चीन हा लोकसंख्याच्या दृष्टीने नंबर 1 ला असता तर , सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची क्षमता आहे . तसे आपल्या देशातील अनेक लोकं विदेशांमध्ये कामगार म्हणून कामास जातात .
भविष्यांमध्ये या फिल्डला येणार सर्वाधिक महत्व : भविष्यांमध्ये आयटी सेक्टरला सर्वाधिक महत्व येईल , यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये या क्षेत्रांमध्ये सर्वाधित जॉब उपलब्ध होणार आहेत . आजच जर पाहिले तर सर्वच क्षेत्रांमध्ये आयटी सेक्टरचा वापर केला जात आहे .
ऑनलाईन शॉपिंग , ऑनलाईन व्यापार , ऑनलाईन मिटींग , ऑनलाईन कामकाज , अनेक कामांचा मोबाईलचा वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करुन अनेक काम सुरळीत केले जात आहेत . यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक वाढणार आहेत . यामुळे या क्षेत्राला कंट्रोल करण्यासाठी कुशल आयटी क्षेत्रातील कामगारांची आवश्यक भासेलच , यामुळे आपण जर आयटी क्षेत्रातील शिक्षण घेतल्यास , भविष्यांमध्ये आपल्या हाताला काम मिळेलच याची गॅरंटी मिळेल . त्याचबरोबर विदेशांमध्ये देखिल चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल .
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…