@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आजच्या युगांमध्ये अत्यावश्यक गरजांमध्ये मोबाईल ही एक बाब अत्यावश्यक ठरत आहे . परंतु मोबाईल पासुन लोकांना अनेक प्रकारचे मानसिक व शारीरिक आजारांचा सामना करावा लागत आहे . लोकांना मोबाईलच्या अतिवापरांमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होत आहेत .
शिवाय आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरण्याचे प्रमाण अधिक वाढत आहेत . जसे मोबाईलचे अनेक फायदे आहेत , त्या तुलनेत मोबाईलचे अनेक तोटे आहेत . जसे कि , आजकाल मोबाईल पासुन अत्यावश्यक माहितींचे आकलन घेण्यापेक्षा मनोरंजनासाठी अधिक वापर करीत आहेत , जसे कि मोबाईलचा वापर चॅटिंग करणे , व्हिडिओ पाहणे , सेल्फी घेवून सोशल मिडीया वर अपलोड करणे असे अनेक प्रकारचे मनोरंजनाकरीता वापर केला जात आहेत .
मोबाईलच्या माध्यमातुन आपणांस अनेक प्रकारच्या माहिती एका क्लिकवर मिळते , आपण जर गुगल वर एखादी माहिती सर्च केल्यास , हजारो माहितींचा भांडार आपल्यासाठी खुला होतो . परंतु आजकालची तरुण पिढी मोबाईलचा सदोपयोग करण्यापेक्षा वाईट गोष्टींसाठी अधिक वापर करतात . तज्ञांचे मते एका दिवसांमध्ये 3 तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर होत असल्यास , आपणांस अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते .
सेलफोनमधून उत्सर्जित होणारी किरणांपासून कर्करोगांसारखे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरत आहेत . तसेच ह्रदय विकार सारखे क्रोनिक रोगांसाठी देखील कारणीभूत असतात . तसेच मोबाईलच्या अतिवापरांमुळे डोळ्यांचे विकार होत असतात , त्याचबरोबर मानसिक आरोग्य बिघडते , तसेच श्रेवणदोष निर्माण होत आहेत . म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळावा .
मोबाईलचा अतिवापर कसा टाळावा : आपण ज्या प्रमाणे आठवड्यातुन एकदा उपवास करीत असतो , त्याप्रमाणे एक दिवस मोबाईलला वापरण्याचा उपवास करावा , तसेच अत्यावश्यक कामासाठीच मोबाईलचा वापर करावा , मनोरंजानासाठी मोबाईल पेक्षा मोठे स्क्रिन असणारे टि.व्ही , लॅपटॉपचा वापर करावा .
लहान मुलांना मोबाईल देण्यापेक्षा खेळणीचे साहित्य द्यावेत , जेणेकरुन लहान मुलांची योग्य प्रकारे शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होईल . अन्यथा मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या योग्य प्रकारे मानसिक वाढ होत नाही .
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…