@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ There are many problems facing the Aadhaar Based Attendance System (AEBAS) of officers/employees. ] : राज्यातीलच नव्हे तर देशातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही आधार बेस्ड प्रणालीद्वारे ( AEBAS ) द्वारे घेण्यात येत आहेत . परंतु या प्रणालीद्वारे हजेरी लावत असताना , अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत .
.
काही अधिकारी / कर्मचाऱ्यांची नोंदणीच नाही : या प्रणालीमध्ये काही अधिकारी / कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची झाली नाही . ज्यांमध्ये ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही ( नावात / जन्म तारीखमध्ये बदल ) , तसेच काहींचे आधारकार्ड व मोबाईल नंबर अगोदरच नोंदविण्यात आलेले आहेत , अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत .
ऑनलाईन हजेरी लावताना प्रारंभिक व समापन स्थितीतील अडचणी : यांमध्ये हजेरी करताना प्रारंभिक स्थिती केल्यास , परत फेस कॅप्चर केल्यास समापन होते . यामुळे हजेरी लावताना अडचणी येत आहेत .
हजेरी झाली कि नाही याबाबत स्पष्टता नाही : सदर आधार बेस ॲप्स मध्ये फेस घेतल्यानंतर प्रारंभिक ( IN ) केल्यानंतर , काही सेकंदात प्रारंभिक अथवा समापन स्थिती दर्शविणारा डिस्प्ले दिसतो . यामुळे हजेरी झाल्याची स्पष्टता कर्मचाऱ्यांना होत नाही .यामुळे कर्मचारी लॉगिनला याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे .
जुन्या व्हर्जनच्या मोबाईल मध्ये वर्क करत नाही : आधार फेस प्रणाली हे जुन्या व्हर्जनच्या मोबाईल मध्ये वर्क करत नसल्याने , ज्यांच्याकडे जुन्या व्हर्जनचे ( 3G ) मोबाईल वरुन आधार फेस हजेरी करण्यास अडचणी आहेत .
वेळ खाऊ प्रक्रिया : शहरी भागांमध्ये नेटवर्क चांगले असल्याने , शहरी भागात ह्या प्रणाली अंतर्गत हजेरी नोंदविण्यासाठी वेळ लागत नाही . परंतु ग्रामीण भागांमध्ये ह्या प्रणाली द्वारे हजेरी नोंदविण्यासाठी 2-5 मिनिटांचा अवधी लागत आहे . तर कधी कधी स्लो नेटवर्क मुळे हजेरी होत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत .
- आज दिनांक 29 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !
- जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , अखेर GR निर्गमित दि.28.04.2025
- अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणापत्र देणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- पहलगाम आतंकवादी हल्यानंतर भारताचे 5 मोठे कठोर निर्णय ; पाकिस्तानने देखिल घेतले भारतावर पलटवारीचे निर्णय !