@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Job in Other Country info ] : आपण जर रोजगाराच्या शोधात असाल तर आपण विदेशांमध्ये जावून चांगल्या प्रकारचा पैसा कमवून भारतामध्ये पाठवू शकता . ज्या देशांचे पैश्यांचे मुल्य हे भारतीय रुपयांपेक्षा अधिक असेल अशा देशांमध्ये काम करुन तो पैसा भारतांमध्ये वापरल्यास , निश्चित चांगला फायदा मिळतो .
जगाच्या पाठीवर भारतीय सर्व ठिकाणी कामानिमित्त गेले आहेत , तेथे काम करुन पैसा भारतांमध्ये पाठवतात , यामुळे भारतीय गंगाजळीमध्ये विदेशी चलन मिळण्यास सहाय्यभूत ठरते . आपल्या देशातील नागरिक जास्त करुन अरब अमिराती ( युएई ) या देशांमध्ये खास करुन दुबई शहरांमध्ये कामानिमित्त जात असतात . या देशातील कायदे / कानुन कडक असल्याने , भारतीय दुबई मध्ये कामानिमित्त जाण्यास कुचराई करत होते .
परंतु आजच्या काळांमध्ये दुबई मध्ये भारतीय नागरिक कामानिमित्त सर्वाधिक आहेत . यांमध्ये वाहनचालक , फिटर , प्लंबर , वेटर , घरकाम अशा प्रकारचे अनेक कामे करण्यासाठी भारतीय कामगार तेथे जातात . युएईचे 1 दिऱ्हम म्हणजेच 22.72 भारतीय रुपया असे मुल्य आहे , यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मोठा फायदा होतो . कारण भारतीय कामगार तेथे काम करतात व पैसा भारतामध्ये पाठवतात .
दुबई मध्ये भारतीय कामगारांना सर्वसाधारण पणे 1800/- दिऱ्हम ते 2200/- दिऱ्हम इतका पगार मिळतो , म्हणजेच भारतीय रुपयाचे मुल्य 40,896/- ते 45,440/- रुपये इतका होते . म्हणजेच दुबई मध्ये सर्वसाधारण कामगारांना देखिल चांगला पगार मिळतो . यामुळे हे देश भारतीयांना आर्थिक दुष्ट्या फायदेशिर तर आहेत , तसेच सुरक्षितेच्या दृष्टीने देखिल चांगला देश आहे . या देशांमध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने , भारतीय विदेशी मंत्रालय या ठिकाणी उत्तमरित्या काम करते .
यानंतर कॅनडा या देशांमध्ये आपल्या देशातील शिख समुदायांचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात . कॅनडा देशामध्ये एकुण लोकसंख्येच्या 2.12 टक्के लोक हे शिख आहेत , या ठिकाणी शिख लोकांना चांगले मान सन्मान आहे . यामुळे हे देश शिख समुदायी लोकांनी रोजगारासाठी उत्तम देश आहे . 1 कॅनडीयन डॉलरची किंमत ही 61.13 भारतीय रुपये इतके मुल्य आहे , यामुळे या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना अधिक लाभदायक ठरणार आहे .
अमेरिकांमध्ये जास्त करुन सॉफ्टेअर इंजिनिअर , शास्त्रज्ञ अशा तज्ञ व्यक्तींसाठी कायम खुले आहे , परंतु एकदा आपल्या देशातील तज्ञ नागरिक या देशांमध्ये कामानिमित्त गेल्यास तो तेथेच स्थायीक होवून जातो . या देशांमध्ये अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत . यामुळे तज्ञांसाठी रोजगाराचे चांगले स्कोप या देशांमध्ये आहे .
याशिवाय सिंगापुर , श्रीलंका , रशिया , कुवेत , ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय नागरिक कामानिमित्त जात असतात . जे कि भारतीय कामगारांना सुरक्षित आहेत .
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…