@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ India’s 5 big tough decisions after Pahalgam terrorist attack; Pakistan also took countermeasures against India. ] : पहलगाम या ठिकाणी वार मंगळवार रोजी झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये 26 निष्पाप भारतीय नागरीक मारले गेले , या क्रुर हल्यानंतर भारताने पाकिस्थानवर 05 कठोर निर्णय घेतले आहे .
हल्यानंतर भारताने घेतलेले 05 कठोर निर्णय : या दहशतवादी हल्यानंतर , भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले असून , 05 मोठे कठोर निर्णय घेतले आहेत . यांमध्ये पुढील 48 तासात पाकिस्थानी नागरिकांनी भारत सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत .
तसेच दुसरा मोठा निर्णय म्हणजे सिंधु जल ( पाणी वाटप ) करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय पाकिस्थानी नागरिकांना भारतामधील मंजूर करण्यात आलेला व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय भारतातील पाकिस्थानी दूतावासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या निर्णयानंतर पाकिस्थानचा भारतावर पटलवारीचे निर्णय : भारताने घेतलेल्या निर्णयानंतर , पाकिस्थानने देखिल पलटवारीच्या भूमिकेत निर्णय घेतले आहेत . यांमध्ये भारतामधून येणाऱ्या हवाई वाहतुकीसाठी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच भारतासोबतचा शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , याशिवाय पाकिस्थान मधील भारतीय नागरिकांना पाकिस्थान सोडण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच वाघा बॉर्डर बंद राहणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या निर्णयामुळे पाकिस्थानी शेअर मार्केट कोसळला आहे . तर भारतीय शेअर बाजारावर फारसा फरक नाही पडला.
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !