पहलगाम आतंकवादी हल्यानंतर भारताचे 5 मोठे कठोर निर्णय ; पाकिस्तानने देखिल घेतले भारतावर पलटवारीचे निर्णय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ India’s 5 big tough decisions after Pahalgam terrorist attack; Pakistan also took countermeasures against India. ] : पहलगाम या ठिकाणी वार मंगळवार रोजी झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये 26 निष्पाप भारतीय नागरीक मारले गेले , या क्रुर हल्यानंतर भारताने पाकिस्थानवर 05 कठोर निर्णय घेतले आहे .

हल्यानंतर भारताने घेतलेले 05 कठोर निर्णय : या दहशतवादी हल्यानंतर , भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले असून , 05 मोठे कठोर निर्णय घेतले आहेत . यांमध्ये पुढील 48 तासात पाकिस्थानी नागरिकांनी भारत सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत .

तसेच दुसरा मोठा निर्णय म्हणजे सिंधु जल ( पाणी वाटप ) करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय पाकिस्थानी नागरिकांना भारतामधील मंजूर करण्यात आलेला व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय भारतातील पाकिस्थानी दूतावासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

या निर्णयानंतर पाकिस्थानचा भारतावर पटलवारीचे निर्णय : भारताने घेतलेल्या निर्णयानंतर , पाकिस्थानने देखिल पलटवारीच्या भूमिकेत निर्णय घेतले आहेत . यांमध्ये  भारतामधून येणाऱ्या हवाई वाहतुकीसाठी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच भारतासोबतचा शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , याशिवाय पाकिस्थान मधील भारतीय नागरिकांना पाकिस्थान सोडण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .

तसेच वाघा बॉर्डर बंद राहणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या निर्णयामुळे पाकिस्थानी शेअर मार्केट कोसळला आहे . तर भारतीय शेअर बाजारावर फारसा फरक नाही पडला.

Leave a Comment