@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ India’s 5 big tough decisions after Pahalgam terrorist attack; Pakistan also took countermeasures against India. ] : पहलगाम या ठिकाणी वार मंगळवार रोजी झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये 26 निष्पाप भारतीय नागरीक मारले गेले , या क्रुर हल्यानंतर भारताने पाकिस्थानवर 05 कठोर निर्णय घेतले आहे .
हल्यानंतर भारताने घेतलेले 05 कठोर निर्णय : या दहशतवादी हल्यानंतर , भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले असून , 05 मोठे कठोर निर्णय घेतले आहेत . यांमध्ये पुढील 48 तासात पाकिस्थानी नागरिकांनी भारत सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत .
तसेच दुसरा मोठा निर्णय म्हणजे सिंधु जल ( पाणी वाटप ) करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय पाकिस्थानी नागरिकांना भारतामधील मंजूर करण्यात आलेला व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय भारतातील पाकिस्थानी दूतावासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या निर्णयानंतर पाकिस्थानचा भारतावर पटलवारीचे निर्णय : भारताने घेतलेल्या निर्णयानंतर , पाकिस्थानने देखिल पलटवारीच्या भूमिकेत निर्णय घेतले आहेत . यांमध्ये भारतामधून येणाऱ्या हवाई वाहतुकीसाठी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच भारतासोबतचा शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , याशिवाय पाकिस्थान मधील भारतीय नागरिकांना पाकिस्थान सोडण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच वाघा बॉर्डर बंद राहणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या निर्णयामुळे पाकिस्थानी शेअर मार्केट कोसळला आहे . तर भारतीय शेअर बाजारावर फारसा फरक नाही पडला.
- पुढील 03 दिवस दि.17 , 18 व 19 मे पर्यंतचा हवामान अंदाज ; या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस !
- शिक्षकांना उन्हाळी सुट्टी 1 जुन पर्यंतच ; 02 जुन ते 15 जुन पर्यंत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन !
- पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा !
- दहावी पास झालात ? आता पुढे काय – जाणून घ्या दहावी नंतर नोकरीच्या अनुषंगाने महत्वपुर्ण अभ्यासक्रम !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या ह्या 02 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय !