@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ India’s 5 big tough decisions after Pahalgam terrorist attack; Pakistan also took countermeasures against India. ] : पहलगाम या ठिकाणी वार मंगळवार रोजी झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये 26 निष्पाप भारतीय नागरीक मारले गेले , या क्रुर हल्यानंतर भारताने पाकिस्थानवर 05 कठोर निर्णय घेतले आहे .
हल्यानंतर भारताने घेतलेले 05 कठोर निर्णय : या दहशतवादी हल्यानंतर , भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले असून , 05 मोठे कठोर निर्णय घेतले आहेत . यांमध्ये पुढील 48 तासात पाकिस्थानी नागरिकांनी भारत सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत .
तसेच दुसरा मोठा निर्णय म्हणजे सिंधु जल ( पाणी वाटप ) करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय पाकिस्थानी नागरिकांना भारतामधील मंजूर करण्यात आलेला व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . याशिवाय भारतातील पाकिस्थानी दूतावासातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
या निर्णयानंतर पाकिस्थानचा भारतावर पटलवारीचे निर्णय : भारताने घेतलेल्या निर्णयानंतर , पाकिस्थानने देखिल पलटवारीच्या भूमिकेत निर्णय घेतले आहेत . यांमध्ये भारतामधून येणाऱ्या हवाई वाहतुकीसाठी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच भारतासोबतचा शिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , याशिवाय पाकिस्थान मधील भारतीय नागरिकांना पाकिस्थान सोडण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच वाघा बॉर्डर बंद राहणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या निर्णयामुळे पाकिस्थानी शेअर मार्केट कोसळला आहे . तर भारतीय शेअर बाजारावर फारसा फरक नाही पडला.
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .