राज्यातील 12 जिल्हे व प्रमुख तीर्थक्षेत्रास जोडणारा शक्तीपीठ महामार्गास मंजूरी ; जाणून घ्या जिल्हे व प्रमुख तीर्थक्षेत्रे !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval for Shakti Peeth Highway connecting 12 districts and major pilgrimage sites in the state ] : दिनांक 24 जुन रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली होती , या बैठकीत सदर शक्तीपीठ महामार्गास मंजूरी देण्यात आली आहे .

या शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातुन जाणार असून , प्रमुख धार्मिक स्थळांना जोडला जाणर आहे . यामुळे तब्बल 18 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे . धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांसाठी ही आनंदाची वृत्त आहे .

शक्तीपीठ महामार्ग या 12 जिल्ह्यातुन जाते :  वर्धा – यवतमाळ – हिंगोली – नांदेड – परभणी – बीड – लातुर – धाराशिव – सोलापुर – सांगली – कोल्हापुर – सिंधुदुर्ग  या 12 जिल्ह्यातुन शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे .

शक्तीपीठाचे दर्शन : या शक्तीपीठ महामार्गाचा प्रमुख उद्देश म्हणजे राज्यातील तीन शक्तीपीठाचे दर्शन होणार आहे . यांमध्ये माहुर , तुळजापुर व कोल्हापुर या तीन शक्तीपीठाचे दर्शन होणार आहे .

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

याशिवाय अंबेजोगाई येथील मुकुंदराज स्वामीचे स्थान या महामार्गास जोडण्यात आले आहेत , तसेच 12 ज्योर्तिलिंग पैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ याशिवाय राज्याचे आराध्य दैवत पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीराचे स्थान तसेच कारंजा लाड , गाणगापुर , अक्कलकोट , औदुंबर , नरसोबाची वाडी या धार्मिक स्थळांना या महामार्ग जोडण्यात आला आहे .

Leave a Comment