@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : इयत्ता दहावी / बारावीच्या या वर्षीपासून होणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये , मोठा महत्वपुर्ण बदल करण्यात आला आहे . या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना देखिल मोठा फायदा होणार आहे . शिवाय या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुढील करीयर साठी मदत देखिल होणार आहे . नेमका कोणता बदल करण्यात आलेला आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE ) बोर्ड परीक्षा दिनांक 15 फेब्रुवारी सुरु झालेले आहेत . यांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांने परीक्षा प्रश्नांमध्ये मोठा बदल केला आहे , यांमध्ये बहुपर्यायी प्रश्नांची संख्या वाढविण्यात आलेली आहे , तर वर्णनात्मक प्रश्नांची संख्या घटविण्यात आलेली आहे .
सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये 50% प्रश्न हे योग्यता बेस्ड ठेवण्यात आलेले आहेत तर वर्णणात्मक / सोर्स बेस्ड पद्धतीनुसार उर्वरित प्रश्न विचारले जाणार आहेत . यांमध्ये 20 टक्के प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे तर 30 टक्के शॉर्ट एंड लॉन्ग अशा पद्धतीने असणर आहेत .
तर इयत्ता 12 वी करीता 40 टक्के प्रश्न हे योग्यता वर आधारीत तर 20 टक्के प्रश्न हे बहूपर्यायी स्वरुपाचे असणार आहेत तर 40 टक्के प्रश्न हे शॉर्ट एंड लॉन्ग स्वरुपाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत .
गुणांची टक्केवारी जाहीर करण्यात येणार नाही : सीबीईसी पॅटर्न मध्ये आता टॉपर्स / टक्केवारी जाहीर करण्यात येणार नाही , त्याऐवजी गुणांच्या आधारावर प्रथम , द्वितीय व तृतीय श्रेणी देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे . जर भविष्यांमध्ये नोकरीकरीता अथवा उच्च शिक्षण याकरीता गुणांची / टक्केवारीची आवश्यकता असल्यास सदर टक्केवारी प्रवेश संस्था अथवा नियोक्त्याद्वारे मोजण्यात येईल .