मुलं आता आई – वडिलांचा सांभाळ करत नसल्यास , पालकांच्या तक्रारीनंतर मुलांच्या नावावरील मालमत्ता होईल रद्द !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी – आजकाल मुलं आई – वडीलांचा उतारवयांमध्ये सांभाळ करीत नाहीत , ज्यावेळी पालकांची संपत्ती मुलांच्या नावावर झाली त्यानंतर मुल आई  – वडीलांना एकटे पाडून उतारवयांमध्ये आधार देत नाहीत . ज्येष्ठ नागरिक यांची देखभाल व कल्याण कायदा –  2007 नुसार , आई – वडीलांचे वय हे 60 वर्षे पेक्षा अधिक झाल्यास , मुलं त्यांचा सांभाळ करीत नसल्यास , पालकांनी मुलांच्या नावे करण्यात आलेली संपत्ती पुन्हा परत देण्याचा अधिकार हा पालकांच्या तक्रारी नंतर आहे .

यांमध्ये बक्षीसपत्र , खरेदी खज रद्द करता येवू शकतो , अशी संपत्ती जर पालकांने मुलांच्या नावे कधीही केली असल्यास , ती पालकांच्या तक्रारी नंतर परत करता येते .अशा प्रकारच्या मालमत्ता मध्येच पालकांना प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार करुन परत मिळवता येईल .

बऱ्याच वेळी वडोलापार्जित जमीन ही आई – वडील उतार वयांमध्ये मुलांच्या नावे करुन टाकतात , परंतु उतारवयांमध्ये मुलं त्यांना आधार देण्याऐवजी घराबाहेर काढले जाते , यामुळे उतारवयांमध्ये मुलांनी आपला सांभाळ करीत नसल्यास , प्रांताधिकाऱ्यांकडून तक्रार करुन , आपली वडोलापार्जित मालमत्ता परत मिळवू शकतो .अन्यथा प्रांताधिकाऱ्यांकडून  ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा – 2007 नुसार वयाच्या 60 वर्षाच्या नंतर पालकांचा सांभाळ खर्च देण्याचे सुचना देवू शकतात .

तर ज्यावेळी आई – वडीलांच्या नावे जमिन असेल अशा वेळी मुलं , आई – वडीलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करतात .यामुळे आत्ताचे पालक देखिल सतर्क झाले असून , लवकर आपल्या मुलांच्या नावे मालमत्ता करत नसताना दिसून येत आहेत .

Leave a Comment