@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी – आजकाल मुलं आई – वडीलांचा उतारवयांमध्ये सांभाळ करीत नाहीत , ज्यावेळी पालकांची संपत्ती मुलांच्या नावावर झाली त्यानंतर मुल आई – वडीलांना एकटे पाडून उतारवयांमध्ये आधार देत नाहीत . ज्येष्ठ नागरिक यांची देखभाल व कल्याण कायदा – 2007 नुसार , आई – वडीलांचे वय हे 60 वर्षे पेक्षा अधिक झाल्यास , मुलं त्यांचा सांभाळ करीत नसल्यास , पालकांनी मुलांच्या नावे करण्यात आलेली संपत्ती पुन्हा परत देण्याचा अधिकार हा पालकांच्या तक्रारी नंतर आहे .
यांमध्ये बक्षीसपत्र , खरेदी खज रद्द करता येवू शकतो , अशी संपत्ती जर पालकांने मुलांच्या नावे कधीही केली असल्यास , ती पालकांच्या तक्रारी नंतर परत करता येते .अशा प्रकारच्या मालमत्ता मध्येच पालकांना प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार करुन परत मिळवता येईल .
बऱ्याच वेळी वडोलापार्जित जमीन ही आई – वडील उतार वयांमध्ये मुलांच्या नावे करुन टाकतात , परंतु उतारवयांमध्ये मुलं त्यांना आधार देण्याऐवजी घराबाहेर काढले जाते , यामुळे उतारवयांमध्ये मुलांनी आपला सांभाळ करीत नसल्यास , प्रांताधिकाऱ्यांकडून तक्रार करुन , आपली वडोलापार्जित मालमत्ता परत मिळवू शकतो .अन्यथा प्रांताधिकाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा – 2007 नुसार वयाच्या 60 वर्षाच्या नंतर पालकांचा सांभाळ खर्च देण्याचे सुचना देवू शकतात .
तर ज्यावेळी आई – वडीलांच्या नावे जमिन असेल अशा वेळी मुलं , आई – वडीलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करतात .यामुळे आत्ताचे पालक देखिल सतर्क झाले असून , लवकर आपल्या मुलांच्या नावे मालमत्ता करत नसताना दिसून येत आहेत .
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !