@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ According to the new Finance Act 2025 approved in Parliament, there will be a reduction in DA and Pay Commission of pensioners. ] : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे , संसदेत नुकतेच नविन वित्तीय कायदा 2025 मंजूर करण्यात आला आहे .
सदर वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शन धारकांना मिळणार महागाई भत्ता व नविन वेतन आयोगाचा लाभ विसरावा लागणार आहे . सदर नविन वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शन धारकांच्या पेन्शनची जबाबदारी ही सरकारची असणार नसल्याचे सदर कायद्यांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे .
डी.ए व नविन वेतन आयोगावर रोख : सदर कायद्यानुसार आता पेन्शन धारकांना महागाई भत्ता व नविन वेतन आयोग लाभ आता सेवानिवृत्तांसाठी नसणार आहे . यांमध्ये निवृत्ती वेतन धारक यांच्या डी.ए तसेच नविन वेतन आयोग संदर्भात सरकारकडून स्वतंत्र रित्या निर्णय घेतला जाईल , अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे .
राज्य / केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांना पेन्शन कायदा 1972 नुसार पेन्शन लाभ दिला जातो , तर दि.17.12.1982 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र / राज्य सरकारच्या पेन्शनधारक तसेच सरकारी कर्मचारी यांमध्ये भेदभाव न करता डी.ए व वेतन आयोग लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता .
हे पण वाचा : 12 वी पात्रताधारकांसाठी महाभरती !
नविन वित्तीय कायदा 2025 : नविन वित्तीय कायद्यानुसार निवृत्तीवेतन धारकांना नविन वेतन आयोग लागु असणार नाही , याशिवाय पेन्शन नियम 1972 चे पेन्शन कायद्याचे नियम / लाभ लागु असणार नाहीत , याशिवाय जुनी पेन्शन योजनानुसार लाभ घेणाऱ्यांना देखिल नविन वेतन आयोगाचा लाभ अनुज्ञेय होणार नाही .
याशिवाय डी.ए संदर्भात सरकारकडून स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतरच डी.ए लाभ दिला जाईल , अन्यथा डी.ए अनुज्ञेय केला जाणार नाही . या संदर्भात पेन्शन धारकांना न्यायालयांमध्ये दाद मागता येणार नाही .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !