@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Rain warning for these districts of the state on March 29th and 30th ] : राज्यातील या जिल्ह्यांना दिनांक 29 व 30 मार्च रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे , याबाबतचा सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात..
राज्यात सध्या कडक तापमान असल्याने , पाण्याचे बाष्पीभवर मोठ्या प्रमणात वाढल्याने , अवकाळी पावसाची निर्मिती होते आहे . यामुळे दिनांक 29 व 30 मार्च रोजी काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .
यामध्ये दिनांक 29 व 30 मार्च रोजी राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्हे यात रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिण्यात आलेला आहे .या कालावधीत कोकण भागातील ठाणे , मुंबई , नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ व कोरडे असणार आहेत .तर पश्चिम महाराष्ट्रात हवामन थंड ( गारवा ) असणार आहे .
तर राज्यातील सोलापुर, सांगली , छत्रपती संभाजीनगर , परभणी , बीड व जालना या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरुपातील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे .या दरम्यानच्या काळात राज्यातील सरासरी तापमान हे 38 ते 40 अंश सेल्सिअस असेल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
या पावसाचा कोकण किनार पट्टीवरील शेतकऱ्यांना हानीकारक ठरणार आहे . कारण सदर चक्रिवादळामुळे आंबा , संत्रे , द्राक्ष या फळबागांवर विपरित परिणाम होवून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे , यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !