आयुष्यात ह्या विचाराचे मनुष्य कधीच सुखी राहु शकत नाहीत ; जाणून घ्या शास्त्रातील माहिती !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ People with this mindset can never be happy in life. ] : मनुष्याला आयुष्यात आनंदी राहावे वाटते , परंतु आनंदी राहण्याच्या भरात काही वाईट बाबींचा विचार आपल्यामध्ये अंगीकारतात ज्यामुळे त्याचे उर्वरित आयुष्य हे दुखमय जाते . आयुष्यात काही गोष्टींमध्ये मनुष्य कधीच सुखी राहू शकत नाही , अशा बाबी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

आई वडीलांचा छाया गमवणारा : आजकालच्या युगांमध्ये मुलं मोठे झाले तर आपल्या आई – बापांना विसरुन जातात , त्यांना कमी लेखतात , तसेच आपल्या घरातुन हाकलून लावतात याशिवाय वडीलांच्या संपत्तीमध्ये आपला हिस्सा मागतात . आई वडीलांवर हात उचलतात अशा प्रकारचे मनुष्य आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाहीत .असे शास्त्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

पर-स्त्री वर वाईट नजर : पर – स्त्री वर वाईट नजरेने पाहणे , त्याच्या चारित्र्यावर चिखल उडवणारे मनुष्य , तसेच स्त्री प्रति मनांमध्ये वाईट भावना उत्पन्न करणे , किंवा स्त्री कडे वासनेच्या नजरेने पाहणे , अशा प्रकारचे मनुष्य आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाहीत .

नवऱ्याला कमी लेखणे : आपल्या संस्कृतीमध्ये पतीला परमेश्वर मानले जाते , कारण पती हा आपल्या घरांमध्ये कर्ताधर्ता असतो , यामुळे स्त्रीने आपल्या पतीला कधीच कमी लेखु नये असे अन्यथा अशा महिला आयुष्यात कधीच सुखी राहु शकत नाहीत ..

काम – वासना – लोभ पासुन वंचित राहणे : आयुष्यात काम – वासना व लोभ या गोष्टींचा कधी हव्यास करु नयेत . ज्यामुळे आपल्या आयुष्याला उतरती कळा सुरु होवू शकते .

Leave a Comment