Khushi Pawar प्रतिनिधी : पाकिस्थान हे भारता सारखे लोकशाही देश असले , तरी भारत – पाकिस्थान देशातील यंत्रणेमध्ये मोठे बदल आहेत . याच बदलामुळे पाकिस्थानात नेहमी अराजकता निर्माण होते . सध्याच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारत – पाकिस्थानांमध्ये मोठ्या घडामोडी दिसून येत आहेत .
पहलगाम हल्यानंतर भारताने सिंधु पाणी वाटप कराराला स्थगिती दिली असून , या स्थगितीमुळे पाकिस्थानातील जनता अधिकच नाराज झालेली आहे . यावर पाकिस्थान सरकारने चिंता व्यक्त न करता थेट युद्धाची भाषा करत असल्याने , पाकिस्थान सारख्या देशाला कितपत योग्य वाटते असा सवाल जनतेकडून विचारणा केली जात आहे .
इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी : पाकिस्थानचे 22 वे पंतप्रधान इम्रान खान हे भारतासोबत सौम्य वागणुक ठेवून , भारताकडून अधिकाधिक तंत्रज्ञानाचा लाभ घेवून पाकिस्थानला विकसनशील देशाच्या रांगेत आणण्याचा मानस होतो .
परंतु इम्रान खान यांच्या भारतासोबत मैत्रीच्या धोरणामुळेच त्यांच्या चुकिचे भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना 14 वर्षाचा तुरुंगवास देण्यात आला आहे , परंतु पाकिस्थानची जनता सध्या शिक्षित झाली असून , त्यांच्या सुटकीची मागणी करीत आहे .
पाकिस्थानमध्ये लोकशाही असली तरी , पाकिस्थानी लष्कराला वेगळे अधिकार आहेत , या वेगळ्या अधिकाराचा वापर करुन पाकिस्थानी लष्कर पाकिस्थानच्या राजकिय क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करते .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत शिक्षक पदांसाठी मोठी पदभरती !
हे चुकीचे असून , सध्याचे जे प्रकरण घडले , त्यामध्ये देखिल पाकिस्थानी लष्कराचे मोठे हात आहे . यामुळे पाकिस्थानी जनता यावर नाराज असून , या घटनेमध्ये कलमा विचारुन गोळ्या घातल्याने , मुस्लिम समुदायांच्या मान हानी झाल्याने पाकिस्थानी जनता आता पाकिस्थानी लष्कर व सरकार विरोधात प्रसार माध्यमातून निषेध व्यक्त करत आहेत .
युद्धामुळे पाकिस्तानचा विकास नाही तर आणखीन अधोगती होईल , यामुळे पाकिस्तान सरकारने आपली भुमिका बदलावी . पाकिस्तानला युद्ध नाही तर विकास हवा आहे अशी बाजू सरकारकडे मांडत आहेत . यामुळे तरुण वर्गाकडून प्रसार माध्यमातून सरकारचे निषेध व्यक्त केले जात आहे .