@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ LIC New Jeevan Shanti Plan ] : भारतीय आयुर्विमा कंपनी मार्फत नवीन पॉलिसी लॉन्च करण्यात आली आहे , सदर पॉलिसीमध्ये एक वेळा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर पेन्शनची हमी मिळणार आहे .
सदर पॉलिसीचे नाव हे नवीन जीवन शांती प्लॅन ( New Jeevan Shanti Policy) असे असून , सदर पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पॉलिसीधारकांचे किमान वय 30 वर्ष तर कमाल वय हे 79 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल . सदर पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षानंतर पेन्शन सुरू होते , सदर पॉलिसी ही सिंगल प्रीमियम पॉलिसी असून , एकाच वेळी सदर पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी लागते .
या पॉलिसी अंतर्गत आपण किमान 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते , तर कमाल रकमेवर मर्यादा असणार नाही . आपण जर या पॉलिसी अंतर्गत 30 वर्ष वय असताना , गुंतवणूक केल्यास आपणास 35 वर्षानंतर पेन्शन सुरू होईल . तर कमाल वय मर्यादा मध्ये 79 वर्ष असताना , गुंतवणूक केल्यास आपणास 84 वर्षाच्या नंतर पेन्शन सुरू होईल.
आपण जर सदर पॉलिसीमध्ये 30 वर्षे वय असताना 11 लाख रुपये गुंतवणूक केल्यास , आपणास वर्षाला 99,440/- रुपये पेन्शन रक्कम मिळेल , तर आपले वय 55 वर्ष असताना सदर पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास , आपणास 60 वर्षाला 102,850/- रुपये वर्षाला पेन्शन रक्कम मिळेल .
सदर पॉलिसी ही नवीन असून या पॉलिसी अंतर्गत आपणास अधिक आर्थिक लाभ मिळत असल्याने , उतार वयामध्ये गॅरंटेड उत्पन्न कमी मिळणार आहे . सदर पेन्शनचा लाभ आपण दरमहा , त्रैमासिक , सहा मासिक व वार्षिक पद्धतीने घेऊ शकता . या पॉलिसीची खास वैशिष्ट्य म्हणजे ही , पेन्शन पॉलिसी खरेदी केल्यानंतर , आपणास आयुष्यभर पेन्शन लाभ मिळेल .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025