Khushi Pawar प्रतिनिधी [ Heavy rainfall warning in these districts of the state for the next 2-3 days ] : यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाची हजेरी खुपच लांबली आहे , तर दुसरीकडे देशामध्ये केरळ भागात मान्सुनचे आगमनाची तारीख जवळ आली आहे .
पाउस सतत पडत असल्याने शेतीची कामे बाकी आहेत , यामुळे यंदाच्या पेरणी लांबणार हे निश्चित आहे . तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 2-3 दिवस काही भागांमध्ये अतिवृष्टीचा जोरदार इशारा देण्यात आला आहे . यामुळे सदर भागातील लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत .
या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2-3 दिवस मध्य महाराष्ट्रातील जिल्हे तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे .
तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट माथा परिसरात तुरळक भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे या सदर भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
राज्यातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्ततिवण्यात आलेली आहे , तसेच कोल्हापुर , पुणे , सातारा व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक अशा ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्ततवण्यात आलेली आहे .
तर राज्यातील हिंगोली , परभणी , धाराशिव , बीड , सोलापुर , सांगली या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटसह जोराचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच विदर्भासाठी पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !