केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये या बाबींवर विशेष तरतुद होण्याची शक्यता !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central modi govt. budget ] : मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्त मंत्री निर्मला सितारमण ह्या तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत . यांमध्ये शेतकरी , सरकारी कर्मचारी , नागरिकांसाठी विशेष तरतुद होण्याची मोठी शक्यता आहे .

शेतकऱ्यांसाठी विशेष : या अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या सन्मान राशी मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . सध्या या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000/- रुपये इतकी रक्कम मिळते , तर यांमध्ये परत 2,000/- रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे , ज्यामुळे वर्षाला 8,000/- रुपये शेतकऱ्यांना लाभ होवू शकतो .

याशिवाय कर्जमाफी करीता देखिल विशेष तरतुद होण्याची शक्यता आहे , तसेच सदर अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ : देशातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन जुनी पेन्शनची मागणी आहे , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्ती वेळी मिळणाऱ्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते .  

जुनी पेन्शन प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम अदा करणेबाबत केंद्रीय वित्त विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे .

याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , निर्णय होण्याची शक्यता आहे . कारण सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन म्हणजेच आठवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे .

अशा प्रकारच्या तरतुदी शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पांमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .

Leave a Comment