@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ birasa muda krushi kranti sudharit Yojana] : राज्य सरकारकडून शेततळे , विहिरी तसेच वीज जोडणी करिता भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे . सदर योजना यापूर्वीपासून सुरू आहे, परंतु या योजनेच्या निकषांमध्ये राज्य सरकारकडून मोठे बदल केले आहेत , यामुळे शेतकऱ्यांना आता वाढीव आर्थिक लाभ मिळणार आहे .
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे , विहिरी त्याचबरोबर वीज जोडणी अनुदान दिली जाते . यापूर्वी सदर योजने अंतर्गत नवीन विहिरी करिता 2.5 लाख रुपये पर्यंत तर , जुन्या विहिरीच्या दुरुस्ती करिता 50,000/- रुपये अनुदान दिले जात होते , यामध्ये सुधारणा करून आता नवीन विहिरी करिता 04 लाख रुपये तर जुन्या विहिरीच्या दुरुस्ती करिता 100,000/- (अक्षरी – एक लाख ) रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .
याशिवाय इनवेल बोअरिंग करिता 40,000/- रुपयांची तरतूद त्याचबरोबर इतर यंत्राकरिता 50,000/- हजार रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे . याशिवाय शेततळ्यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण करण्याकरिता रुपये एक लाख अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे .
सद्यस्थितीमध्ये सदर योजना अंतर्गत तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये दिले जाते , तर यामध्ये सुधारणा करून आता तुषार सिंचन खरेदी करण्याकरिता 47 हजार रुपये अनुदानाची तरतूद केली आहे तसेच परसबाग करिता अनुदान दिले जाते .
सदर योजनेअंतर्गत नवीन विहिरीचा लाभ घेतल्यास सदर लाभार्थ्यास वीस वर्षाच्या नंतर सदर विहीर दुरुस्त करण्याकरिता लाभ घेऊ शकतील . तर विज जोडणी करिता वीस हजार रुपये व विद्युत पंप संच देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . यामुळे सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता अधिक फायदे होणार आहेत .
लाभ कसा घ्यावा : सदर योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून सदर सुधारित बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !